
कृषि उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर
रामनगर मार्केट यार्ड
कृषि उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर ची स्थापना सि. पी. अॅड बेरार अॅक्ट 1935 चे तरतूदी नुसार दि. 12 /05/1960 ला झाली असून प्रत्यक्ष कामकाजास दि. 01/01/1968 पासून सुरवात झाली आहे. सध्या स्थितीत बाजार समितीचे कार्यक्षेत्रात चंद्रपूर व बल्लारपूर तालूक्यातील चंद्रपूर आणि बल्लारपूर श्हर सह एकुण 138 गावे आहेत.
शेतमालाची ई-लिलाव पध्दतीने विक्री, शेतमालाची साठवणूक, योग्य मोजमाप, चुका-याची रक्कम त्वरीत देण्याची व्यवस्था हयावर नियंत्रण ठेवून शेतक-यांचे जास्तीत जास्त हित साधण्याचा उद्देश् समोर ठेवून बाजार समिती प्रगती पथावर कार्यरत आहे. बाजार समितीने सर्व प्रकारचे धान्य, फळे, भाजी, कापूस, लाल मिरची (सुखी), गुरे व ढोरे, अंडे, मासोळी, कोंबडया इत्यादी शेतमालाचे नियमन केलेले आहे. मुख्य बाजार स्थळ रामनगर, चंद्रपूर येथे स्वतःचे मालकीचे जागेवर असून बाजार स्थळाकरीता 6.60 हेक्टर शासकीय जमीन विकत घेतली आहे.
सर्व माहितीसाठी....